नवी मुंबई APMC फळ मार्केट विविध प्रकारच्या फळांनी सजले !
नवी मुंबई APMC फळ मार्केट विविध प्रकारच्या फळांनी सजले !
- फळांची मागणी वाढल्याने फळांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ
- फळ मार्केटमध्ये ३५७ गाड्यांची आवक
थंडीचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणही आनंद दायक झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाला आणि फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. परिणामी बाजारात उत्तम दर्जाची   फळे दिसू लागली आहेत... फळांची मागणी वाढल्याने फळांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.   त्यानुसार बाजारात फळांची आवक वाढत असते. आता फळ बाजार विविध प्रकारच्या फळांनी सजले आहे.. नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये ३५७ गाड्यांची आवक झाली असून   फळमार्केटमध्ये सफरचंद ७० ते ९० रुपये, डाळिंब १००   रुपये,   हिरवे द्राक्ष   ८० ते १००   रुपये किलो तर   काळे द्राक्ष   १५० रुपये किलो , संत्री ५० रुपये , अननस ९० रुपये , पपई ३० रुपये किलो , कलिंगड ३४ रुपये किलो ,अंजीर ७० ते १०० रुपये किलो , पेरू ३५ ते ५५ रुपये किलो ,चिकू ४० ते ५० प्रतिकिलोने विकली जात आहेत....