सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ-पणन मंत्री जयकुमार रावल
.jpg)
6 फेब्रुवारी 2025 पर्यंत खरेदी होणार
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुबई :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 
पुढे बोलताना मंत्री रावल म्हणाले की राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती,ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता.आज ती मुदतवाढ मिळाली. या मुदतवाढी मुळे राज्याला दिलेल्या 1413269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्याला पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारी पर्यंत 4लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टना पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे.6 फेब्रुवारी पर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 मुदत वाढ दिली, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्र सरकारचे पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांनी आभार मानले.