मुंबई APMC मधील रस्ते, धक्के जलमय नालेसफाईचे 3 कोटी कोणाच्या खिशात?

- दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केला जातोय मात्र पाणी निचरा का होत नाही
Mumbai Apmc News Update: नाले सफाईच्या आडून मुंबई एपीएमसीचे काही अधिकारी आणि ठेकेदार यांचे भ्रष्टाचाराचे रैकेट सुरू असल्याची बातमी सतत एपीएमसी न्यूज़ डिजिटल चॅनेल दाखवले आहे ,मात्र मागील 5 वर्षा पासून यावर संचालक मंडळ आणि   प्रशासन कोणी दखल घेतली नाही त्यामुळे दरवर्षी पावसात मार्किट तुंबतोय .यावर पणन मंत्री व पणन सचिव गंभीर दखल घेऊन SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी बाजार घटकाकडून केला जात आहे . 
पहिल्याच मोठ्या पावसात मुंबई एपीएमसीच्या   रस्त्यावर व धक्यावर मुंबई एपीएमसीतील संचालक मंडळ व एपीएमसी प्रशासनाचा भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, फूटपाथ ,धक्के सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. बाजारघाटकाना   प्रचंड हाल झाले. एपीएमसी प्रशासनाकडून   दरवर्षी लाखो   रुपये बाजार आवारातील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पावसात पाणी तुंबते असे चित्र दिसते. बाजारघाटकाचे   पैशावर कंत्राटदार व संचालक मंडळ   यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच व्यपर्यांचे हे हाल होत आहेत, असा गंभीर आरोप व्यपारी आणि वाहतूक दराने   केला आहे.
मुंबई एपीएमसी संचालक मंडळ व प्रशासनावर आरोप करून व्यापाऱ्याने पुढे म्हणाले की, पहिल्याच पावसात बाजार घटकांची   दाणादाण उडाली असून धान्य व मसाला मार्केटच्या   रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मार्किट   तुंबली आहे. रस्ते, धक्के , विंगच्या आत जलमय झाली आहेत. एका पावसाने संचालक मंडळ व एपीएमसी प्रशासनाचा   भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की येणाऱ्या काळात निवडणूक लागली तर व्यापाऱ्यांची   मते मागायला यांना बोटीनेच गळ्यात   जावे लागेल असे दिसत आहे. मान्सूनपूर्व कामासाठी दरवर्षी एपीएमसी प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करते पण वस्तुस्थिती पाहता हे पैसे जातात कोठे? हा प्रश्न निर्माण होतो. संचालक मंडळ ,पणन , एपीएमसी प्रशासन, कंत्राटदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई एपीएमसी मार्केटचे   हे हाल होत आहेत.
कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केटमध्ये वाऱ्याच ठिकाणी नाले नाही तरीसुद्धा नालेसफाई आणि गाळ काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केला जात आहे . यासाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च केला जातोय ,यासाठी 3 कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च करुनही मार्केटच्या   नालेसफाई झाली नाही तर हातसफाई करुन मुंबई एपीएमसी   तिजोरीमधील व्यापाऱ्यांच्या   कराच्या पैशावर डल्ला मारला आहे. मुंबई एपीएमसीला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला बाजार घटक माफ करणार नाही, असेही काही व्यापाऱ्याने   म्हणाले.