मुंबई APMC कार्यकारी अभियंता गोपाळ मिस्तरी यांच्या पदोन्नतीवर चार वर्षांचा अन्याय – आमदार शिंदेंनी उघड केली खरी कथा

मुंबई APMC कार्यकारी अभियंता गोपाळ मिस्तरी यांच्या पदोन्नतीवर चार वर्षांचा अन्याय – आमदार शिंदेंनी उघड केली खरी कथा
“मुंबई एपीएमसीत 10 कर्मचाऱ्यांचा गौरवपूर्ण निरोप सेवा आणि संघर्षाची आठवण कायम”
“मुंबई एपीएमसीमध्ये सेवानिवृत्तीचा भावुक क्षण गोपाळ मिस्त्री यांच्या पदोन्नतीवर आमदार शिंदेंची खंत”
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनावर कार्यरत असलेल्या 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या भावनिक वातावरणात पार पडला. 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विशेषतः एका महिला कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या मुलाने दिलेल्या भावना व्यक्त करताना उपस्थितांचं मन हेलावून गेलं.
मुंबई एपीएमसीतील कार्यकारी अभियंता गोपाळ मिस्तरी यांना त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी अखेर हक्काची पदोन्नती मिळाली असली, तरी त्या मागील चार वर्षांतील अन्यायाची खरी कहाणी सेवानिवृत्ती समारंभात आमदार शशिकांत शिंदे यांनी उघड केली. या समारंभात 10 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यात मिस्त्री यांचा समावेश होता.
गोपाळ मिस्तरी यांनी बाजार समितीतील विविध विकासकामांमध्ये नेहमी पारदर्शकता आणि गुणवत्ता यावर भर दिला. कोणतीही अयोग्य कामे व अनियमितता असलेल्या प्रकरणांना त्यांनी वेळोवेळी विरोध केला. यामुळे काही अंतर्गत गटांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळेच त्यांच्या पदोन्नतीला चार वर्षांपासून अडथळा आणण्यात येत होता, असे आमदार शिंदे यांनी यावेळी   स्पष्ट केले.
“गोपाळ मिस्त्री हे नेहमी चुकीच्या कामांना आक्षेप घेत असत. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या पदोन्नतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा अन्याय लक्षात येताच आम्ही सचिव, सहसचिव, संचालक व संघटनांच्या पदाधिकाऱ्याची   चर्चा करून त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला,” असे आमदार शिंदे यांनी सांगितले.
समारंभाच्या वेळी मिस्तरीसह इत्तर कर्मचाऱ्यांचे   कार्य कौतुकास्पद असल्याचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नमूद केले. मिस्तरी त्यांच्या नियमानुसार, पण ठाम निर्णयक्षमतेमुळे बाजार समितीतील अनेक विकासकामे दर्जेदार पद्धतीने पार पडली. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर असे प्रामाणिक अभियंता पुन्हा मिळतील का, यावर शंका उपस्थित होत आहे.
मिस्तरी यांचे योगदान
गोपाळ मिस्त्री यांनी आपल्या सेवाकाळात बाजार समितीच्या रस्ते, गटार, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रत्येक कामात गुणवत्ता आणि नियोजनशीर अंमलबजावणी या तत्त्वांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे बाजार आवारातील अनेक व्यापारी, कामगार आणि कर्मचारी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत आहेत.
एक हळवा क्षण
या समारंभात इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणेच गोपाळ मिस्तरी यांना निरोप देताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी भावुक झाले. एक महिला कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना तिच्या मुलाने दिलेली प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.
सदर कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे, संचालक बाळासाहेब सोळसकर, रावसाहेब गिरासे, जिजाभाऊ पाटील,   सचिव डॉ.पी.एल.खंडागले .सहसचिव महेंद्र म्हस्के ,उप सचिवसह अधिकारी   आणि कर्मचारी उपस्थित होते.बाजार समितीसारख्या संस्थांमध्ये प्रामाणिक अधिकारी आणि अभियंत्यांची गरज अधिक आहे. गोपाळ मिस्तरी यांचे उदाहरण हे भविष्यातील अधिकाऱ्यांसाठी आदर्श ठरू शकते.
-सेवानिवृत्त घेतलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या नाव पुढील प्रमाणे:
1-गोपाळ मिस्तरी-कार्यकारी अभियंता 
2-एच .एस.अळवेकर 
3-आर .जी .देशमुख 
4-श्रीम.यू.एस .शेटे 
5-यू .आर .शेळके 
6-आर .वाय.कदम 
7-डी .जी कोबल 
8-ए.पी .जुंबडे 
9-संदीप बोठे 
10-के .आर .हराळ