Mumbai Apmc Rain: महाभ्रष्ट संचालक मंडळ व प्रशासनामुळे मुंबई APMC डुबवली, बाजरघटकांकडून संचालक मंडळ व एपीएमशी प्रशासनावर टीकास्त्र

कोट्यावधी रुपयांची कामे करून सुधा दरवर्षी पावसाळ्यात मुंबई एपीएमसी पाण्यात का जातोय.
महाभ्रष्ट संचालक मंडळ व नियोजन शून्य अधिकाऱ्यामुळे दरवर्षी पावसात मुंबई APMC तुंबतोय.
मुंबई APMC रस्त्यावर संचालक मंडळ   आणि   एपीएमसी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे.
मसाला मार्केटच्या मुख्य नाला साफसफाई न करता नवीन गटार लाईन बांधणे ,होत असलेल्या निकृष्ट दर्जाचे कामामुळे पावस थांबून सुधा पाणी निचरा होत नाही
'मुंबई एपीएमसीची   तुंबई व्हायला वेळे आधी आलेला पाऊस जबाबदार'-प्रभू पाटील सभापती मुंबई एपीएमसी
नवी मुंबई : मसाला मार्केटमधे मुख्य नालेसफाई न करता कोट्यवधी रुपयांची गटार लाईन बांधणे ,रस्त्यांची कामे केला जात आहे . त्याच प्रमाणे दर वर्षी पावसाळ्यापूर्वी जे नालेसफाई केला जातोय ते नाले सफाई नाही हाथ सफाई झाल्यावर दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबई एपीएमसीची   तुंबई झाल्यानंतर आता बाजारघाटकाकडून महाभ्रष्ट संचालक मंडळ व प्रशासनचा भोंगळ कारभाराबदल नाराजगी पसरले जात आहे.
मुंबईसह राज्यभरात मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात नवीमुंबईकरांची दैना केली असून रेल्वे पासून सर्व वाहतुक   विस्कळीत झाली होती. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली . त्याच बरोबर आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सुधा पाणी तुंबल्याने बाजारघाटकाना नाहक त्रास सहन करावा लागले होते .
महत्त्वाचं म्हणजे अनेक भागांमध्ये नालेसफाई, रस्त्यांची कामे रखडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.दरवर्षी   पावसात मुंबई एपीएमसीची तुंबई झाल्यानंतर आता व्यापाऱ्याकडून संचालक मंडळ व एपीएमसी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे.
व्यापाऱ्यांनी केले संचालक मंडळ व प्रशासनावर टीका
गेल्या 5 वर्षांपासून मुंबई एपीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या संचालक मंडळाच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई एपीएमसी दर पावसात तुंबतोय आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई ची कामे केला जातोय मात्र काहीच ठिकाणी नाले नाही तरीसुद्धा त्याच कामावर लाखो रुपये बाजारसमितीच्या तिजोरीतून रिकामी केला जातो .सर्वात जास्त फटका कांदा बटाटा मार्किट ,मसालामार्केट आणि धान्य मार्किटच्या व्यापाऱ्यांना   नाहक त्रास सहन करावा लागत आहे .कोट्यावधी रुपये सेस भरून सुद्धा मूलभूत सुविधा मिळत नाही .आता   मार्केटमध्ये रस्ते ,नवीन गटार लाईन बांधण्यात काम युद्ध पातळीवर सुरू आहे .मात्र ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे केला जात असल्याची माहिती समोर आली आहे .सदर काम करताना मुख्य नाला सफाई न करता गटार लाईन बांधण्यात आली आहे .त्यामुळे पावस थांबून सुद्धा पाणी निचरा होत नाही .
पणन मंत्री ,पणन सचिव १००   दिवसाचा आराखडा घेतात मात्र ही गोष्टी दिसत नाही का ? असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे .   संचालक मंडळला मुंबई कृषी उत्पन बाजार समितीवर   इतका द्वेष का आहे की त्यांनी मागील ५ वर्ष पासून मुख्य नाला साफसफाई न करता नवीन ड्रेनेज लाईन बांधणे ,अर्धवट रस्ते, गटार लाईन नसताना साफसफाईच्या दरपत्रक काढणे .त्यामुळे   पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्याने अडचणीत आणले आहे, अशी टीकाही काही व्यापाऱ्यांनी   केली आहे. 
महाभ्रष्ट संचालक मंडळ व नियोजन शून्य अधिकाऱ्यामुळे दरवर्षी   पावसात एपीएमसी तुंबतोय.मुंबई एपीएमसीच्या   रस्त्यावर संचालक मंडळ   आणि मुंबई एपीएमसी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात बाजारघाटकांची दाणादाण उडाली असून गाळ्याच्या धक्के व रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. पावस संपून सुद्धा ठिकठिकाणी पाणी तुंबली आहे. रस्ते, धक्के   सगळीकडे पाणीच पाणी आहे, असे म्हणत व्यापाऱ्यांनी संचालक मंडळ व प्रशासनावर   तोफ डागली आहे.त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा मार्किट पाण्यात जात आहे .बाजार घटकांना लुटणा-या या भ्रष्ट टोळीला बाजारघटक माफ करणार नाहीत,