भारत पाकिस्तान तणावादरम्यान मोठा निर्णय, 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद; ही आहे संपूर्ण यादी

भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताकडून 32 विमानतळं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशी 400 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विमानन नियामक डीजीसीएने सांगितलं की, ही बंदी 9 मेपासून 15 मेपर्यंत सकाळी 5.29 पर्यंत राहील. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास रिशेड्यूल करा आणि यासाठी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क करा. सरकार आणि सुरक्षा एजन्सी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेईल.
कोणती विमानतळं बंद राहणार..
श्रीनगर
जम्मू
लेह
अमृतसर
चंदीगड
अंबाला
लुधियाना
जोधपूर
बिकानेर
जैसलमेर
उत्तरलई
राजकोट
भूज
जामनगर
धर्मशाला
बठिंडा
पटियाला
पठाणकोट
शिमला
किशनगढ
हिंडन
पोरबंदर
मुंद्रा
कांडला
अधमपूर
अवंतीपूरा
हलवारा
कांग्रा
केशोड
भुंतर
नलिया
सरसावा
थोईसे